जीवन...एक चकवा..
आज दोघंही खूपच आनंदात होते…..काहीतरी वेगळं करण्याची खूप इच्छा होती पण त्यांना त्यांच्या मुलांच्या रूटिनमध्ये व्यत्यय आणायचा नव्हता म्हणून त्यांनी मुलांना-नातवंडांना सरप्राईज द्यायचं ठरवलं. दोघंही संध्याकाळी घराबाहेर पडले...आता कळवूया का मुलांना?... उतावीळपणानी तिने त्याला विचारले..अन् त्याच्या होकाराची वाट न बघताच मोबाईल काढला..फोन लावला...तिकडून मुलाच्या फोनची रिंग वाजली...तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता..मुलाने फोन घेतला...आणि ती काही बोलण्यापुर्वीच तिकडून मुलानी निरोप दिला.."आई..आज आमचा स्वयंपाक नको करूस हं...हिची मैत्रिण खूप वर्षांनी भारतात आली आहे....तिच्यासोबत आम्ही डिनरला जातोय....मुलंही आमच्यासोबत आंटीला भेटायला येणार ... तेव्हा तुम्ही जेवून घ्या हं...आणि हो औषध - गोळ्या घ्यायला विसरू नका ..बाय" ...असे म्हणून आई बोलायच्या आधी फोन बंद झाला.. एका क्षणात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब होऊन डोळ्यात पाण्याचे थेंब आले ...काहीही न बोलता तिने फोन ठेवला.. तो किंचीत हसला अन बोलला.."मुलांचा कार्यक्रम ठरलाय ना"..तिने मान हलवली..तो देखील थोडा उदास झाला..म्हणाला.. "आता..? ह्या सरप्राईजचं काय? ती थोडी सावरली आणि म्हणाली आपलंच सरप्राईज..आपणच एंजॉय करायचं.."
एव्हाना दोघांचे डोळे भरले होते. थोडा वेळ गेला दोघांनी एकमेकांना सावरलं आणि त्यांनी मुलांसाठी ठेवलेलं सरप्राईज चा कार्यक्रम स्वतः उरकून घेतला…. रात्र झाली
रात्री मुलाचा व्हॉट्स ऍप वर मॅसेज आला .."आम्ही पोहोचलो...तुम्ही लवकर या.."तिने पोस्ट टाकली.."तुम्ही झोपा.."मुलाने पुन्हा विचारलं.."तुम्ही कुठे,?"आईनी दोघांचा हॉटेलमध्ये अरेंज केलेल्या डिनरचा फोटो टाकला.."त्या" दोघांच्या मागच्या कट-आऊटनी मुलगा आश्चर्याने दणकून उभा राहिला ...त्याने तीला थेट फोन लावला..."आई तुम्ही कोणत्या हॉटेलात आहात..? मी येतोय.."ती शांतपणे म्हणाली.."असू दे बाळा...आम्ही हॉटेल सोडलंय आता..आणि हो..आज आम्ही घरी येणार नाही..लोणावळ्यासाठी निघालोय..तुम्ही शांतपणे झोपा..आणि हो..बाबांच नेहमीचं दरवाजे लावण्याचं काम आजच्या दिवस करून घे हं बेटा..सर्वांना आजच्या विशेष दिवसाचा विशेष आशिर्वाद सांग...बाय.."मुलाने पुन्हा व्हॉट्सऍप उघडला..आणि भरल्या डोळ्यानी त्याने मॅसेज पाहिला..."50th..Wedding Anniversery".....
त्याने हळूच तिचा हात हातात घेतला.. तिने स्वतःच्या डोळ्यांच्या कडा पुसत त्याला म्हणाली..." जीवन म्हणजे चकवा असतो नाही?...फिरून त्याच जागी आणणारा..? आपल्या आयुष्याची सुरूवात आपण दोघांनीच केली होती ना?... आणि आता आजही आपण दोघंच उरलोय…….…!!
No comments:
Post a Comment