माझी शाळा.....

          माझी शाळा......
आज सकाळ पासून पाऊस म्हणजे मी म्हणतोय... थांबला म्हणतोय तोवर पुन्हा धो-धो कोसळायला सुरु... शाळेत आज पाऊस बघतच दिवस गेला. पण एक गोष्ट आज चांगली घडली आज लिहायला विषय मिळाला. ......‘शाळा’ ..... सहज विचार करत बसलो होतो. मला वाटतं शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं मंदिर नाही, तर ती आपल्या बालपणीच्या आठवणींचं गहिवरलेलं स्थान असतं. शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी आपल्या आयुष्यात असंच एक अविस्मरणीय स्थान घेऊन त्याच स्वप्न पूर्ण करायला भरारी घेतो. आणि त्या भरारीसाठी लागणारी पहिली झेप घेण्याची ताकद ही शाळाच देत असते. 
         आता थोडं माझ्या शाळेबद्दल...... ‘भोसे’...... दोन डोंगरांच्या कुशीत वसलेलं,  द्राक्ष आणि उसाच्या हिरवळीनं  नटलेलं, रत्नागिरी-नागपूर हायवेवरून जाणाऱ्या प्रत्येकाला आपलं सौंदर्य थाटात दाखवणारं गाव म्हणजे आमचं भोसे गाव आणि अशा गावात आहे माझं हायस्कुल स्वातंत्र्यवीर नेमू सत्याप्पा चौगुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोसे.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या, माझ्या गावच्या प्रेमळ माणसांच्या आणि चहूबाजूची हिरवळ, मोकळं आकाश, शांत वातावरण या सगळ्याच्या साक्षीने माझं हायस्कुल अगदी थाटात उभं आहे. लाल मातीचं मैदान, दुमजली टूमदार इमारत त्याला लागून कार्यक्रमाचा स्टेज आणि स्टेजच्या कोपऱ्यावर फडकणाऱ्या झेंड्याचा खांब आणि मैदानाच्या चाहूबाजूनं असणारी झाडं शाळेची शोभा वाढवत होती.
         कितीतरी विद्यार्थ्यांचं हसणं, रडणं किंचाळनं आणि वेगवेगळ्या आवाजात ओरडणं हे सगळं पाहिलेल्या त्या वर्गाच्या भिंतीवर त्या विद्यार्थ्यांची शिकण्याची ओढ देखील कोरलेली आहे. खरं तर पुस्तकापेक्षा हे वर्गच जगण्याचे धडे देतात. याच वर्गात गणिताची सूत्रं शिकवली जातात तर मराठीतून भाषा कशी जिवंत करता येते हेही शिकवलं जातं.
सकाळी प्रार्थना झाल्यापासून ते दुपारी अभ्यास, संध्याकाळी खेळ होईपर्यंत क्वचितच कुणाला घराची आठवण येत असेल.  या सगळ्यात दिवस कसा जातो ते कळतही नाही.
    खरं तर शाळा म्हणजे एक वेगळं जग असतं. असं जग की त्या जगात मित्रच सर्व काही असतात. माझ्या शाळेचंही असंच आहे. शाळा सोडून भले कित्येक वर्षे झाली पण सगळे मित्र मिळून वर्षातून एकदा शाळेत भेटतातच. कारण या वेगळ्या जगातल्या शेवटच्या बाकावरून झालेली मैत्री आणि त्याच्या आठवणी अशा असतात आहेत की त्या आयुष्यभर एकमेकांची साथ सोडू देत नाहीत. 
.    बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल म्हणलं की या शाळेत आम्हाला फक्त शिक्षणच मिळालं नाही तर आम्हाला जगायला पण शिकवलं. आज ही लोकं आयुष्याच्या दुसऱ्या वळणावर आहेत परंतु त्यांच्या प्रत्येक यशमागे शाळेचं योगदान आहे जाणवल्याशिवाय राहणार नाही.

No comments:

Post a Comment

ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,

​ ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए ,   वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है … आज डायरी उघडताच ...