ईच्छाओंके अनुरूप जिने का जुनून होना चाहिए,
वरना परिस्थितीयां तो सदैव ही विपरीत होती है…
आज डायरी उघडताच इंस्टाग्राम वर वाचलेलं हे वाक्य मनात घोळु लागलं होतं. कारण आजचा दिवसही काही फारसा सोपा नव्हता. कुठल्याही परिस्थिती चा सामना करताना समाजाचा विचार करणं कितपत योग्य आहे. मला असं वाटतय कि समाजाचा विचार करावा पण त्यावेळी स्वतःला विसरून त्याचा विचार करावा हे मला पटत नाही. आज एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली परिस्थिती बदलत नाही तोवर आपल्यालाच बदलावं लागतं. मनातल्या इच्छा जपण्यासाठी, आपल्याला स्वतःच्या स्वभावात बदल हा करावाच लागतो. आपल्या इच्छांसाठी कुणी वाट मोकळी करून देत नसतं, ती आपल्यालाच शोधावी लागते. मनामध्ये थोडी भीती, शंका, आणि भरपूर प्रश्न असले तरीही एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं असतं.
आपल्या आयुष्याची जबाबदारी आपल्यालाच उचलवी लागते समाज तिथे कुठेच नसतो. स्वतःचा आवाज दाबून समाजाचा गोंधळ ऐकत बसलो तर आयुष्य कधीच शांत होणार नाही समाजाचा विचार करताना आपण बऱ्याचदा लोक काय म्हणतील? असा विचार करतो. पण हे लोक आपल्यासोबत रात्र जागून काढत नसतात. ते लोक आपल आयुष्य जगत नसतात. लोकांना फक्त एक काम असतं आपल फुकटच मत व्यक्त करायचं बाकी काही नाही. कधी कधी लोक चांगलं मत व्यक्त करतात. पण ते फक्त आपल्या दुःखावर घातलेली फुंकर असते एवढंच....